बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविरोधात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पाहाल तर खबरदार,असा थेट इशारा देत ठाकूर यांनी भाजपच्या महिला सुरक्षेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपच्या मंचावर ही वादग्रस्त वक्तव्ये झाली असताना, विखे आणि फडणवीस शांत बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
महिलांच्या सुरक्षेचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी या वक्तव्यावर कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल,असेही ठाकूर म्हणाल्या. देवेंद्रजी, तुमच्या राज्यातील ही परिस्थिती रामराज्य म्हणायची का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.