Chhagan Bhujbal big claim : छगन भुजबळ यांचे वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी नुकत्याच दिलेल्या वक्तव्यात मोठा दावा केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मॉक पोल काय आहे ते मला माहिती नाही. काय करायचं ते करा. मी ते वाचलं आहे. मात्र, ईव्हीएममध्ये गडबड असती, तर मी दीड-दोन लाख मतांनी निवडून आलो असतो.”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Chhagan Bhujbal : जरांगेमुळे मताधिक्यावर परिणाम?
भुजबळ यांनी यावेळी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा उल्लेख करत सांगितले की, “मी नेहमीच 60 हजार मतांनी निवडून आलो आहे. मात्र, यावेळी जरांगेमुळे माझे मताधिक्य कमी झाले आहे. ईव्हीएममध्ये गडबड असती, तर जरांगे किंवा आणखी कोणीतरी आले असले तरी माझे मताधिक्य वाढले असते.”
ईव्हीएमवर शंका उपस्थित नाही
“ईव्हीएममध्ये जर खरोखर काही गडबड झाली असती, तर माझ्या मताधिक्यावर याचा सकारात्मक परिणाम दिसला असता. मात्र तसे काहीही झालेले नाही. त्यामुळे मी कसे म्हणू की ईव्हीएममध्ये गडबड आहे?” असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतील अंतर्गत घडामोडी
संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, “मी ऐकलं आहे की, आमदारांना सांभाळण्यासाठी एक अनुभवी नेता हवाच असतो. त्यावेळी एकनाथ शिंदे हे ज्युनिअर होते, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळण्यावर काही प्रश्न उपस्थित झाले असतील.”
आमदारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांना आमदारांच्या सुरक्षेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, “मला याची कल्पना नाही. मी मंत्रिमंडळातही नाही. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चौकशी करतील आणि लक्ष देतील.”
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ईव्हीएमवरील चर्चेबाबत स्पष्ट भूमिका घेतली असून, जर गडबड असती, तर त्याचा फायदा त्यांनाही झाला असता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महाविकास आघाडीत नेतृत्वाच्या भूमिकांवर उमटलेल्या प्रश्नचिन्हांवरही त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.