Indian Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबण्याचे नाव नाही! गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान

Indian Stock Market Crash

सेन्सेक्स-निफ्टी कोसळले | गुंतवणूकदार चिंतेत

Indian Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात सुरू झालेली घसरण अद्यापही कायम आहे. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी बीएसई सेन्सेक्स १२२.५२ अंकांनी घसरून ७६,१७१.०८ वर बंद झाला, तर निफ्टी २६.२५ अंकांनी घसरून २३,०४५.२५ च्या पातळीवर पोहोचला. शेअर बाजारातील या सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


Indian Stock Market Crash अब्जाधीश गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान

या घसरणीमुळे केवळ किरकोळ गुंतवणूकदारच नाही, तर अब्जाधीश गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणात नुकसान सोसले आहे.

मुकुल अग्रवाल – ₹८८४ कोटींचे नुकसान
आकाश भन्साळी – ₹९३२ कोटींचे नुकसान
नेमिश शाह – ₹४६२ कोटींचे नुकसान
मधुसूदन केळी – ₹५०६ कोटींचे नुकसान
विजय केडिया – ₹२७८ कोटींचे नुकसान
सुनील सिंघानिया – ₹५१५ कोटींचे नुकसान


कुठल्या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण?

आजच्या ट्रेडिंग सत्रात महिंद्रा अँड महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, आयशर मोटर्स, आयटीसी, हिरो मोटोकॉर्प या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

दुसरीकडे, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, बजाज फिनसर्व, एचडीएफसी लाइफ, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा कन्झ्युमर या समभागांमध्ये वाढ झाली.


निफ्टी ५० मधील सर्वाधिक नुकसान झालेल्या कंपन्या

गेल्या एका महिन्यात निफ्टी ५० मधील ज्या कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, त्यांची यादी खालीलप्रमाणे –

१. ट्रेंट लिमिटेड – २०.४% घसरण

२. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन – १४.६% घसरण

३. एचसीएल टेक्नॉलॉजी – १४.१% घसरण

४. टाटा मोटर्स – १२.३% घसरण


रुपयाची घसरणही सुरूच | डॉलरच्या तुलनेत कमकुवत स्थिती

भारतीय रुपयातही सतत घसरण होत आहे. बुधवारी रुपया किरकोळ घसरून ८६.८८ प्रति डॉलरवर बंद झाला. मंगळवारी तो ८६.८३ प्रति डॉलर वर बंद झाला होता.


शेअर बाजाराच्या घसरणीमागील कारणे कोणती?

१. जागतिक बाजारातील अस्थिरता

अमेरिका आणि युरोपमधील आर्थिक मंदीची शक्यता वाढल्याने भारतीय बाजारावरही परिणाम झाला आहे.

२. विदेशी गुंतवणूकदारांची विक्री

FII (Foreign Institutional Investors) ने भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले आहेत.

३. चलनवाढ आणि व्याजदर वाढ

RBI च्या व्याजदर धोरणाचा प्रभाव गुंतवणुकीवर दिसून येत आहे.


आगामी काळात बाजार सावरू शकतो का?

विशेषज्ञांच्या मते, आगामी काही आठवड्यांत बाजार स्थिर होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी जागतिक आणि स्थानिक आर्थिक स्थिती सुधारण्याची गरज आहे. गुंतवणूकदारांनी भावनिक निर्णय न घेता दीर्घकालीन रणनीती आखावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.


तुम्हाला या घसरणीचा फटका बसला का? तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा!