नाशिकच्या पंचवटी परिसरात झालेल्या या घटनेत कोयता गँगने युवकावर प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामागे मागील भांडणातून उद्भवलेला किरकोळ वाद असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तत्काळ तपासाची कारवाई करून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
घटनेचा तपशील असा की, रोहित अनिल माळी आणि त्याचे मित्र अमृतधाम परिसरातील चिअर्स बिअर शॉपीसमोर उभे असताना अचानक कोयता गँगच्या संशयितांनी रिक्षा आणि दुचाकीवरून येऊन त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. उमेश चांडोले या संशयिताने कोयत्याने रोहितच्या कपाळावर आणि कानावर वार करत धमकी देत पळ काढला.
पोलिसांनी घटनास्थळावरून फरार झालेल्या संशयितांचा शोध घेतला आणि उमेश चांडोले, स्वप्नील सांगळे, वैभव भडांगे, आणि विशांत भोये या चार आरोपींना अटक केली आहे. अजून काही संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.