नाशिकः नाशिक जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. महायुतीने या निवडणुकांमध्ये नाशिकमधील सर्वच्या सर्व १४ जागांवर विजय मिळवून सत्ता संपादन केली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गेल्या दोन दशकांपासून भाजपने नाशिकमध्ये आपले मजबूत बस्तान बसवले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही मागे टाकले आहे.यंदाच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रितपणे जोरदार कामगिरी केली, ज्यामुळे सर्व जागांवर विजय मिळवता आला.
जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रभावी प्रचार आणि आश्वासनांच्या अंमलबजावणीची हमी यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला
नाशिक जिल्ह्यातून तीन ते चार आमदार मंत्रिमंडळात सामील होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये दोन विद्यमान मंत्री आणि एक किंवा दोन नवीन चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो.विधानसभेचे उपसभापती देखील मंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहेत.
नाशिक जिल्ह्यात भाजपचा वाढता प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करू शकतो. जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेली आश्वासने पूर्ण होण्याची अपेक्षा असून, या विजयामुळे जिल्ह्यातील मतदारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.