“Will Athawale’s Statement Come True? – Tug-of-War for Leadership in the MahaYuti Alliance!”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या महायुतीतील मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विधानाने चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी मोठे विधान करत म्हटले होते की, “महायुतीत निकालानंतर कोणताही वाद होणार नाही, परंतु जर वाद झाला तर मुख्यमंत्रिपदासाठी मी तयार आहे.”
यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्यात महायुतीची सत्ता येणार असून मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यांच्या वक्तव्यावर आठवले यांनी सहमती दर्शवली होती. मात्र, सध्या महायुतीतील नेतृत्वासाठी सुरू असलेल्या हालचालींमुळे “आठवलेंचे वाक्य खरे ठरते की काय?” अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगत आहे.