Latest News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पॉडकास्टद्वारे महाराष्ट्रातील राजकारणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी “दसऱ्यानंतर निवडणुका होतील, त्यामुळे बेसावध राहू नका, ही क्रांतीची वेळ आहे” असं स्पष्ट केलं. त्यांनी महाराष्ट्राच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत म्हटलं की, “महाराष्ट्र लुटला जातोय, आपण आपट्याची पानं वाटत आहोत.”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राज ठाकरे यांनी मतदारांना विचारलं की, “तुमच्यातला राग मला कधी दिसत नाही, तुम्ही नेहमी त्याच लोकांना निवडून देता.” मतदान हा लोकांचा खरा हक्क आणि शक्ती आहे, पण त्याचा योग्य वापर होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “मतदानाच्या दिवशी तुम्ही मतदानाचं शस्त्र ठेवून देता आणि नंतर शस्त्र बाहेर काढता” असे ते म्हणाले.
शमीच्या झाडावरची शस्त्र उतरवण्याचं आवाहन करत त्यांनी सांगितलं की, ही वेळ बदल घडवण्याची आहे. राज ठाकरेंनी जाहीर केलं की, “उद्या मनसेच्या मेळाव्यात मी सविस्तर बोलणार आहे,” असं सांगत त्यांनी लोकांना जागरूक होण्याचा सल्ला दिला.