देवळाली मतदारसंघातील निवडणूक चुरस आता अधिक रंगात आली आहे. अपक्ष म्हणून आपला प्रचार सुरू ठेवलेल्या राजश्री अहिरराव यांना अचानक शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून उमेदवारी मिळाल्यामुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी घेतलेल्या या निर्णयामुळे मतदारसंघातील वातावरण तापले आहे आणि महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या अजित पवार गट आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे उमेदवार आता देवळालीत समोरासमोर उभे ठाकले आहेत. या अचानक बदललेल्या निर्णयामुळे दोन्ही गटांतील अस्वस्थता उघड झाली आहे. मतदारसंघातील जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आता या दोन्ही पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
राजश्री अहिरराव यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिल्याने, देवळालीतील मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीत फूट पडल्याच्या या पार्श्वभूमीवर देवळालीतील निवडणुकीचे निकाल राज्याच्या राजकारणात नवा प्रवाह निर्माण करू शकतात.