नाशिकच्या पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीलगत असलेल्या गुजरात सीमावर्ती भागातील घनदाट जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात मौल्यवान खैर वृक्षांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. या वृक्षांची अवैध तोड करून लाकडाचा वापर काथ निर्मितीसाठी केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या सशस्त्र दक्षता पथकाने मंगळवारी (दि. २६) चिपळूण येथील तीन कारखान्यांवर छापे टाकले. या कारवाईत विनापरवाना खैराच्या लाकडापासून काथ तयार करण्याचा अवैध उद्योग उघडकीस आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
खैर तोड आणि तस्करीचा तपशील
नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल दुर्गम भागातील खैर वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात सुरू असून, तोडलेला खैराचा माल गुजरातमार्गे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणपर्यंत पोहोचविला जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. चिपळूणमधील कुंभारवाडा येथील सिंडिकेट फुड्स तसेच दहिवली खुर्द येथील सचिन कथ्था फॅक्टरी आणि तिरुपती कथ्था फॅक्टरी येथे या लाकडांपासून काथ तयार करण्यात येत असल्याचे आढळले.
वनविभागाच्या तपासानुसार, या कारखानदारांनी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना घेतलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
छाप्याचा मोठा परिणाम
वन विभागाच्या या छाप्यावेळी संबंधित कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा खैर लाकूड साठा, तयार कथ्याचा लगदा, आणि तयार काथ जप्त करण्यात आला आहे. कारवाईची माहिती मिळताच संशयित कारखानदार विक्रांत टिटंबे आणि सचिन पाकळे हे फरार झाले. वन पथकाने त्यांच्या नावाने समन्स जारी केले असून, कारखान्यातील महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून पुढील तपास सुरू आहे.
याशिवाय, कारखाने सीलबंद करण्यात आले असून, जप्त करण्यात आलेल्या मालाचे मूल्यांकन आणि पुढील कार्यवाही लवकरच होणार आहे.
पहिल्यांदाच थेट कारखान्यांवर धडक
खैराच्या Khair smuggling : नाशिक वनविभागाने चिपळूणमध्ये टाकलेल्या छाप्याने उघडकीस आणली खैर तस्करीची साखळी तस्करीला आळा घालण्यासाठी यापूर्वी फक्त वाहनांवर कारवाई केली जात असे. मात्र, यंदा प्रथमच नाशिक वनविभागाने तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचून थेट काथ निर्मितीच्या कारखान्यांवर छापे टाकले आहेत. या कारवाईत नाशिक वन परिक्षेत्राच्या अधिकारी सविता पाटील, सुरेश गवारी, वनपरिमंडळ अधिकारी रूपेश दुसाने यांच्यासह १५ सशस्त्र कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी स्थानिक पातळीवर मदत केली.
महिला अधिकाऱ्यांचा समावेश आणि टीमवर्क*
ही कारवाई विशेष ठरली ती महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे. खैर नाशिक वनविभागाने चिपळूणमध्ये टाकलेल्या छाप्याने उघडकीस आणली खैर तस्करीची साखळी तस्करीच्या पाळेमुळे नष्ट करण्याच्या निर्धाराने वन विभागाने केलेली ही पहिलीच मोठी मोहीम असल्याने तस्करी करणाऱ्यांपासून कारखानदारांपर्यंत सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तस्करी रोखण्याचे आव्हान
खैराच्या लाकडांची तस्करी रोखणे हे वनविभागासाठी मोठे आव्हान ठरले आहे. खैर वृक्षांची मागणी उच्च असल्यामुळे तस्करीचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत वन विभागाने केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरत असून, भविष्यात अशा प्रकारच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आणखी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
वनविभागाने या मोहिमेत दाखवलेल्या सजगतेमुळे खैर तस्करीसारख्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हे पण वाचा Nashik : नाशिक वनविभागाची मोठी कारवाई: खैर तस्करीच्या जाळ्यावर धडक; संशयित शैलेशभाई वर्माची अटक