Nashik Railway Pit Line: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून विकसित भारत योजनेअंतर्गत नाशिकमध्ये रेल्वे पिट लाईन मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भविष्यात नाशिकमधून अधिकाधिक रेल्वेगाड्या देशभर सोडणे शक्य होईल. नाशिक-मुंबई प्रवाशांसाठी स्वतंत्र रेल्वेसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पिट लाईनमुळे(Pit Line)नाशिकच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला नवे बळ
या प्रकल्पांतर्गत नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरात भुसावळ विभागांतर्गत दोन स्टेबलिंग रेल्वे लाईन उभारल्या जातील. तसेच, देवळाली रेल्वेस्थानक (५ किमी) येथे ही पिट लाईन (Pit Line)स्थापन केली जाणार आहे.
या पिट लाईनमुळे होणारे फायदे:
✅ नाशिकहून थेट मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे प्रवास करणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी नवीन रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता.
✅ पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस यांसारख्या गाड्यांचे नाशिकहून थेट सुटण्याचे मार्ग सुकर होणार.
✅ किसान रेल्वे, देवळाली-भुसावळ शटल, नाशिक-बडनेरा मेमू गाड्यांची देखभाल, स्वच्छता आणि दुरुस्ती आता नाशिकमध्येच शक्य होणार.
✅ २०२७ सिंहस्थ कुंभमेळ्या दरम्यान देशभरातून येणाऱ्या गाड्यांसाठी पार्किंग आणि देखभाल व्यवस्था उपलब्ध होणार.
पिट लाईन म्हणजे काय?
पिट लाईन म्हणजे ज्या ठिकाणी रेल्वेगाड्या शेवटचा थांबा घेतात आणि नव्याने सुरू होतात. येथेच गाड्यांची प्राथमिक देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता आणि पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध असते. नाशिकमध्ये पिट लाईन नसल्याने अनेक गाड्या इतर ठिकाणांहून सुटत होत्या.
छगन भुजबळ यांनी मानले रेल्वेमंत्र्यांचे आभार
या निर्णयाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नाशिकसाठी ही पिट लाईन म्हणजे मोठा टर्निंग पॉईंट आहे. लवकरच नाशिकमधून थेट देशभर रेल्वे सेवा उपलब्ध होण्याची आशा आहे!