ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांसाठी पक्क्या घरांचे स्वप्न साकार
PMAY : नाशिक जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजनेत अव्वल स्थान – ९५% उद्दिष्ट पूर्णप्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana – PMAY) ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना तसेच कच्च्या आणि मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांसह पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाते. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांना घरकूल योजनेंतर्गत उद्दिष्ट देण्यात आले असून, नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक १ लाख ४६ हजार ६४ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक जिल्ह्यातील घरकूल मंजुरीत मोठी प्रगती
राज्यात सर्वाधिक उद्दिष्ट नाशिक जिल्ह्याला मिळाल्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या तत्परतेने १ लाख ३७ हजार ६३० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. राज्य शासनाच्या १०० दिवस उपक्रमात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा समावेश असून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) योजनेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे.
घरकुलासाठी १.२० लाखांचे अर्थसाहाय्य
प्रधानमंत्री आवास (PMAY)योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला १ लाख २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे ग्रामीण भागातील बेघर तसेच मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित व पक्के घर मिळणार आहे.
नाशिक जिल्हा अव्वल – ९५% उद्दिष्ट पूर्ण
संपूर्ण राज्यात सर्वाधिक उद्दिष्ट प्राप्त असतानाही नाशिक जिल्ह्याने ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करून अव्वल स्थान मिळवले आहे. लवकरच घरकूल योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.
राज्य शासनाच्या १०० दिवस उपक्रमात मोठी भरारी
राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्याने ९५% उद्दिष्ट पूर्ण करून घरकुल मंजुरीत आघाडी घेतली आहे.
लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत १.२० लाख रुपये अनुदान
- १०० दिवसांत घरकूल मंजुरीसाठी विशेष प्रयत्न
- लवकरच पहिला हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांची प्रतिक्रिया
“प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरजू नागरिकांना घरकूलाचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. नाशिक जिल्ह्याने मोठे उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात आघाडी घेतली आहे.”
प्रधानमंत्री आवास योजनेमुळे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांचे हक्काचे पक्के घराचे स्वप्न साकार होत आहे. नाशिक जिल्ह्याने ९५% उद्दिष्ट पूर्ण करून एक आदर्श निर्माण केला असून, लवकरच लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळणार आहे.
He Pan Wacha : तब्बल आठ महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र ची बैठक संपन्न