पिंपरी-चिंचवड- माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन घोटाळ्याच्या(shinchan ghotala prakaran) मुद्द्यावर मोठे वक्तव्य केले आहे. “मी राज्यातील सिंचन प्रकल्पांची सखोल माहिती मिळवण्यासाठी जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढायला लावली होती. त्यात अजित पवारांची चौकशी करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, मात्र श्वेतपत्रिका काढणे म्हणजे चौकशीच सुरू असल्याचा गैरसमज झाला आहे,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित एका मुलाखीदरम्यान ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याबाबतची आपली भूमिका मांडली आहे. चव्हाण यांनी पुढे असेही नमूद केले की, “राज्यात सिंचन घोटाळा झाला होता, हे पंतप्रधानांनीही कबूल केले होते, आणि यामुळेच अजित पवारांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.
“कराड दक्षिण मतदार संघातील कौटुंबिक स्नेह मेळाव्यात या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारताच, चव्हाण यांनी या प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली.सिंचन घोटाळ्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून चर्चेत आहे, आणि अजित पवार यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा हा त्यावेळचा मोठा राजकीय वाद ठरला होता.