विजेचा सतत लपंडाव, रस्त्यावरच्या व कॉलोनी मधल्या उघड्या डीपी , अव्वा च्या सव्वा नागरिकांना बिले येणे , वीजप्रवाह येणाऱ्या सणा सुदी मध्ये खंडित न होणे, व विजे संदर्भातल्या विविध समस्या असल्याने मनसेने महावितरणाच्या द्वारा वर ‘ट्यूब लाइट’ फोडून निषेध व्यक्त केला व महावितरणा च्या मुख्य अभियंतास निवेदन दिले देण्यात आले .. विजेचा लपंडाव व वीज पुरवठा खंडित होण्यापासून व्यावसायिकांची व नागरिकांची सुटका करावी अन्यथा मनसे वीज बिल न भरण्यास नागरिकांना आव्हान करेल असा इशारा मनसेच्या वतीने शहर संघटक अॅड. नितीन पंडित यांनी महावितरणास दिला आहे या वेळी शहर संघटक अॅड. नितीन पंडित, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे ,कामगार सेनेचे बंटी कोरडे, पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे , शहर उपाध्यक्ष विनायक पगारे , मनविसे प्रदेश कार्यकारणी सदस्य शशी चौधरी व उमेश भोई मनविसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे ,मीरा आवारे , भानुमती अहिरे ,दत्ता कोठुळे, दीपक बोराडे , वैभव शिंदे ,सौरव चव्हाणके, कृष्णा सोनार, संतोष सोळंके, उपस्थित होते
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गेल्या दोन महिन्यांपासून नाशिकरोड व नाशिक शहर भागातील बहुतांश भागात वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. वीज जाण्याची व येण्याची वेळ राहिलेली नाही विजेचा सतत लपंडाव हा दिवसभर सुरु आहे अश्या परिस्थितीत विजेवर अवलंबून व्यावसायिक हताश झाले आहेत, नागरिक त्रस्त झालेले आहे , घरातील गृहिणी सतत विजेचा लपंडावा मुळे घरातील कामात व्यत्यय येत असल्यामुळे संतप्त होत आहे. सतत विजेचा लपंडावामुळे घरातील व उपकरणे जसे टीव्ही , संगणक, फ्रिज , इस्तरी , घरातील वॉशिंग मशीन , मिक्सर ,इलेक्ट्रिक गिझर इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये बिघाड होत आहे व नागरिकांना उपकरणे दुरुस्त करण्यात वेळ व पैसा वाया जात आहे. महावितरण जर नागरिक किंवा व्यावसायिक यांच्या तर्फे वीज बिल भरण्यास २ ते ३ दिवसाचा विलंब झाल्यास महावितरण त्या नागरिक किंवा व्यावासिकाची वीज कापण्यास मागे पुढे बघत नाही तर मग वीज ग्राहक वेळेवर वीज बिल भरून देखील नियमित वीजपुरवठा मिळावा अशी अपेक्षा वीज ग्राहकाने का ठेवू नये ? असा संतप्त सवाल मनसेने महावितरणाला आंदोलना दरम्यान विचारला आहे.
वीज पुरवठा खंडित होण्याचा परिणाम शाळेतील मुलांच्या अभ्यासावर होत आहे , शाळेतील मुलांच्या सामईच्या परीक्षा सुरु आहे , सायंकाळच्या विजेच्या लपंडावामुळे पालक व शाळेचे विध्यार्थी त्रस्त आहेत. निवेदनावर व्यावसायिक व नागरिकांच्या सह्या आहेत.