शिर्डी: साईबाबा मंदिराच्या सुवर्ण कलशारोहणाला आज 72 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने सुरू असलेल्या या महत्त्वपूर्ण सोहळ्याचा 72 वा वर्धापन दिन साईबाबा संस्थान आणि पारनेरकर महाराज गुरुसेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
1952 साली रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या हस्ते साई मंदिरावर सुवर्ण कळसाची स्थापना करण्यात आली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आज शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या शताब्दी मंडपात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी विष्णू महाराज पारनेरकर यांनी सांगितले की, “आज 72 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद होत असून, आगामी काळात सुवर्ण दिन साजरे करण्याचा संकल्प घेतला आहे.”
साई भक्तांसाठी हा सोहळा विशेष महत्त्वाचा असून, यानिमित्ताने साईबाबांच्या आशीर्वादाने पुढील वर्षात अमृत महोत्सवाच्या दिशेने वाटचाल होणार असल्याचे साई संस्थानच्या वतीने जाहीर करण्यात आले.