MBC मराठी मुंबई : शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो आहे. आमचे संस्कार वेगळे आहेत असे बोलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असतांना पंतप्रधान यांनी या विषयावर बोलत माफी मागितली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या घटनेनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात वाढवण बंदराच्या कामांचे भूमीपूजन आणि अनेक विकासकामांचे उद्घाटनासाठी आले आले. त्यावेळी त्यांनी या घटनेचा उल्लेख आपल्या भाषणात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०२३ मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. पण अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला.
यावेळी ते आपल्या भाषणात म्हणाले की, भारताचे महान सपुत वीर सावरकरांना शिव्या देतात. अपमानित करतात असे लोक आम्ही नाहीत. देशभक्तांच्या भावनांचा चुरडा करतात. सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. कोर्टात जातात, पण त्यांना पश्चात्ताप होत नाही. हे यांचे संस्कार आहे. मी इथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. अशा आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी माफी मागत आहे. आमचे संस्कार वेगळे आहे. आमच्यासाठी अराध्य दैवतेपेक्षा काहीच मोठं नाही असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन विकसित महाराष्ट्र-विकसित भारताच्या संकल्पावर आम्ही वेगाने वाटचाल करत आहोत. आज पालघरमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी हा या दिशेने एक ऐतिहासिक प्रयत्न म्हणून स्मरणात राहील असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले