मुंबई: भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणाऱ्या आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या तीन अत्याधुनिक युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Modi बुधवारी (दि. १५) मुंबईत येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी महायुतीचे मंत्री व आमदारांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
दोन तासांचा ठराविक कार्यक्रम
सकाळी १०.३० वाजता दक्षिण मुंबईतील नौदल गोदीत पंतप्रधानांच्या हस्ते तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण होईल. यानंतर, त्याच ठिकाणी महायुती सरकारमधील मंत्र्यांना आणि आमदारांना ते संवादासाठी संबोधित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अन्य महत्त्वाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
खास व्यवस्था: वाहने आणि मोबाइलवर निर्बंध
पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव, त्यांच्या ताफ्याशिवाय इतर कोणत्याही वाहनांना नौदल गोदीत प्रवेश दिला जाणार नाही. आमदारांसाठी विधानभवनातून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, संवाद आणि भोजनादरम्यान, मोबाइल नेण्यास मनाई आहे. गेटवर मोबाइल जमा करण्याची सोय करण्यात आली आहे.
खारघरमधील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन
दुपारी ३.३० च्या सुमारास पंतप्रधान मोदी Modi नवी मुंबईतील खारघर येथे इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर लोकांच्या उपस्थितीची शक्यता आहे.
महायुतीला कानमंत्राची उत्सुकता
महायुतीचे मंत्री व आमदारांना पंतप्रधान काय संदेश देतील याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात हे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल, अशी चर्चा आहे.