महाराष्ट्र राज्य सरकारने सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, २ हजार ते ८ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचाचे मानधन ४ हजारांवरून ८ हजार रुपये झाले आहे, तर उपसरपंचाचे मानधन १५०० रुपयांवरून ३ हजार रुपये करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८ हजारांपेक्षा जास्त आहे, तिथे सरपंचाचे मानधन ५ हजारांवरून १० हजार रुपये, तर उपसरपंचाचे मानधन २ हजारांवरून ४ हजार रुपये करण्यात आले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या मानधनवाढीमुळे राज्य सरकारवर सुमारे ११६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.