नाशिक – जीवनात उत्तम प्रकारचे यश प्राप्त करायचे असेल तर परिश्रम करणे महत्वाचे असते. परिश्रम केल्यास उत्तम यश प्राप्त करता येते. परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष बी. के. मुखेडकर यांनी केले. तरुण ऐक्य मंडळाच्या श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महविद्यालयात पुणे विद्यार्थी गृहाच्या बी.एड. महविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या आंतरवासीता वर्गाच्या समारोप समारंभप्रसंगी मुखेडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी महविद्यालयाचे प्राचार्य सुधीर नवसारे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरवासीता वर्गाचे दोन गटातील जवळ जवळ २० विद्यार्थी सहभागी झाले होते. दहा दिवसाच्या आंतरवासीता वर्गात विविध उपक्रम व अध्यापणाचे कार्य करण्यात आले. यावेळी, महाविद्यालयाचे प्रा. दिलीप अहिरे, आंतवासीता वर्गाचे प्रमुख प्रा. अरविन्द जिंजर, प्रा रोहिणी भालेराव, उपमुख्याध्यापक उमेश आटवणे, पर्यवेक्षक कारभारी जोंधळे, जितेंद्र सिसोदे आदि उपस्थित होते. यापसंगी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांनी घेतलेल्या विविध स्पर्धेतील यशवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. स्वागत प्रास्ताविक प्रा. अरविन्द जिंजर यांनी केले तर पाहण्यांचा परिचय नेहा महाजन यांनी करून दिला. यावेळी प्रा. दिलीप अहिरे, सुधीर नावसारे, रघुनाथ सुरसे आणि प्रशिक्षणार्थी रितेश भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. रोहिणी भालेराव यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षके तर कर्मचारी, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.