गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने महाराष्ट्रात पुन्हा जोरदार कमबॅक केला असून, अनेक भागांमध्ये पावसाचा तडाखा बसत आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रायगड, आणि रत्नागिरीया जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, हवामान खात्याने नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई आणि परिसरात पावसाची स्थिती:
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, आणि कल्याण-डोंबिवली या भागांमध्ये दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली आहे. काही भागांत जोरदार पावसामुळे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा:
पुण्यात मागील तीन दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक यंत्रणेला अडथळा येत असून, नागरिकांनी पावसाच्या स्थितीची पूर्ण माहिती घेऊनच बाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
सावधगिरी बाळगा:
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांमध्येही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व आपत्कालीन यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.