Latest News: समीर वानखेडे यांच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या बातम्यांनी अलीकडेच अनेक माध्यमांमध्ये खळबळ माजवली होती. वानखेडे हे नाव सतत चर्चेत राहिलं आहे, २०२१ मध्ये झालेल्या आर्यन खान प्रकरणामुळे. त्यावेळी त्यांनी मुंबईजवळ कॉर्डोलिया क्रूझवर झालेल्या धाडीत १७ जणांना अटक केली होती, ज्यात शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानही होता. त्यानंतर उच्चस्तरीय तपासात आर्यन निर्दोष सिद्ध झाला होता, ज्यामुळे वानखेडेंवर आरोपांच्या वादळात सापडले होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
वानखेडे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आणखी जोर मिळाला. काही माध्यमांनी दावा केला की ते शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करून धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. मात्र, शिंदे गटाने हे दावे फेटाळून लावले. त्यांच्या प्रवक्त्यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितलं की, वानखेडेंच्या पक्ष प्रवेशाच्या बातम्या आणि निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी केवळ अफवा आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचाही मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान केलं आहे की, भाजप २८८ पैकी १५० जागांवर लढण्याचा विचार करत आहे. त्यांनी असेही म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युतीच्या जागावाटपात त्याग करावा लागू शकतो. भाजपाने याआधी अनेकवेळा युती टिकवण्यासाठी मोठा त्याग केला आहे, त्यामुळे यावेळेसही शिंदे यांना जागांची वाटाघाटी करताना समंजसपणे निर्णय घ्यावा लागेल.