Nashik News | Social Justice Minister Sanjay Shirsat Land Purchase at Trimbakeshwar Raises Eyebrows
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik News :
नाशिक : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सध्या वादग्रस्त भूखंड खरेदी आणि हॉटेल विट्स लिलाव प्रकरणामुळे चर्चेत असतानाच, आता त्र्यंबकेश्वरजवळ निसर्गरम्य भागात त्यांनी सुमारे ४.४६ एकर खासगी जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. दीड वर्षांपूर्वी हा व्यवहार करण्यात आला असून, सद्यस्थितीत या जमिनीचे बाजारमूल्य १४ ते १५ कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Sanjay Shirsat Land News | 15 कोटींच्या जमिनीचा व्यवहार; चौकशीची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, ही जमीन नाशिक-त्र्यंबक रस्त्यालगत असून ती मंत्री शिरसाट, त्यांचे पुत्र तुषार शिरसाट आणि नातेवाईक प्रशांत रुपवते यांच्या नावे आहे. जमीन खरेदीवेळी याची किंमत २ कोटी रुपये इतकी असल्याचे कागदपत्रांवरून समजते, मात्र सध्या परिसरात एकरी दर ३ कोटी रुपये पर्यंत पोहोचल्याने एकूण मूल्य १५ कोटी रुपये पर्यंत पोहोचले आहे.
Trimbakeshwar Land Controversy | मंत्री शिरसाट यांचा रिसॉर्ट प्लॅन?
सदर जमीन सध्या सीमेंट फेन्सिंग करून सुरक्षित करण्यात आली असून, प्रवेशद्वारावर ‘त्र्यंबकराज’ असे नाव आणि प्रशांत रुपवते यांचा मोबाईल नंबर नमूद आहे. त्यामुळे या ठिकाणी भविष्यात मोठे हॉटेल किंवा रिसॉर्ट उभारले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी येथे जेसीबीने सपाटीकरणाचे काम सुरू होते. तसेच, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचे संकेत मिळत आहेत.
Sanjay Shirsat Under Fire | आधीच सुरु आहेत आरोप
संजय शिरसाट यांच्यावर यापूर्वी शेंद्रा एमआयडीसीमध्ये नियम डावलून सहा कोटींचा भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे, ११० कोटींच्या हॉटेल विट्सचा लिलाव अवघ्या ६७ कोटींमध्ये घेतल्याचा मुद्दाही चर्चेचा विषय ठरला होता. त्यातच या नवीन जमीन व्यवहारामुळे त्यांच्यावरची राजकीय आणि कायदेशीर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
भूमिपूजन आणि रिसॉर्ट चर्चांवर स्पष्टीकरण
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन दीड-दोन वर्षांपूर्वी विकली असून, हॉटेल किंवा रिसॉर्ट उभारण्याच्या चर्चा निराधार आहेत. केवळ सपाटीकरणाचे काम झाले असून, मंत्री शिरसाट कुटुंबीय भूमिपूजनासाठी आले होते हे दावे अखत्यारित आणि खोटे असल्याचे ते सांगतात.