नाशिक : वाराणसीच्या धर्तीवर जागतिक धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याची वेळ आली आहे!

Nashik: It is time to make it a global religious tourism center on the lines of Varanasi!

नाशिक सह्याद्रीच्या कुशीतून जागतिक ओळखीकडे! कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या धार्मिक पर्यटनाचा कायापालट आवश्यक

नाशिक : दर १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला जागतिक पातळीवर चमकण्याची सुवर्णसंधी मिळते. मात्र आजपर्यंत या संधीचे योग्य सोनं नाशिकनं केलं नाही, एवढंच नव्हे तर गोदावरी मातेचं आरोग्यसुद्धा या आयोजानांतून सुधारलेलं नाही.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या पार्श्वभूमीवर २०२७ च्या कुंभमेळ्याच्या आयोजनाने ही साखळी मोडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकला वाराणसीप्रमाणे एक जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्यासाठी नियोजन, इच्छाशक्ती आणि धाडस यांची आवश्यकता आहे.

नाशिकनाशिकची धार्मिक ओळख आणि संभाव्य भविष्य

नाशिक हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून, त्र्यंबकेश्वर मंदिर, गोदावरी घाट, सप्तशृंगी देवीसारखी स्थळं लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहेत. कुंभमेळा ही नाशिकची जागतिक ओळख आहे आणि राज्य शासनाकडून याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली हे रूपांतर शक्य आहे, अशी नाशिककरांसह संत-महंतांचीही अपेक्षा आहे.

घाट क्षेत्राचं सुधारणा आवश्यक : ‘वाराणसी मॉडेल’चा अवलंब करा

  • रामतीर्थासारख्या घाटांवर अतिक्रमण झाल्यामुळे मोकळेपणा हरवला आहे
  • गोदावरी नदीकाठ स्वच्छ, सुंदर आणि खुला व्हावा
  • ‘हेरिटेज वॉक’, गंगा आरतीसारखी आरती स्थळं, भक्तांसाठी खुली जागा
  • अतिक्रमण हटवणे, अरुंद रस्त्यांचं रुंदीकरण आवश्यक

काशीप्रमाणे नाशिकमध्येही घाट क्षेत्र भव्य आणि भक्तांना सुलभ होणे आवश्यक आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडॉर : एक सुवर्णसंधी

उत्तर प्रदेशातील काशी कॉरिडॉर, गुजरातमधील द्वारका, आणि मध्य प्रदेशातील महाकाल कॉरिडॉर यांसारख्या संकल्पनांच्या धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर तीर्थ कॉरिडॉर उभारणे अत्यंत आवश्यक आहे. यात समावेश असावा:

  • पायी यात्रा मार्ग
  • शटल/मेट्रो सेवा
  • माहिती फलक
  • स्वच्छतागृहे
  • आराम केंद्र

गर्दी व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

  • वाराणसीमध्ये रोज ५० लाख भाविक जमतात
  • नाशिकमध्ये १० लाख भाविक जरी एकत्र आले, तरी व्यवस्थापन कठीण
  • २०१५ आणि २०२७ च्या कुंभमेळ्यात तंत्रज्ञान, अपेक्षा आणि गर्दीतील फरक प्रचंड
  • डिजिटल माध्यमांमुळे भाविकांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता

त्यामुळे स्मार्ट सिटी नियोजन, क्राउड कंट्रोल सिस्टम आणि आपत्कालीन सेवा आधुनिकीकरण आवश्यक आहे.

राजकीय इच्छाशक्ती, प्रशासनाचा सहभाग आणि जनतेचं सहकार्य गरजेचं

मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री महाजन यांनी वाराणसी मॉडेलचा अभ्यास करून तशीच अमलबजावणी नाशिकमध्ये करण्याची गरज आहे. पण फक्त घोषणा नव्हे, तर खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल:

  • अतिक्रमणमुक्त घाट
  • शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था
  • सुरक्षित गर्दी नियंत्रण
  • भाविकांसाठी मूलभूत सुविधा

नाशिक व त्र्यंबकेश्वर या जुळ्या धार्मिक शहरांसाठी जलदगतीने पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासारखे अनुभवसंपन्न अधिकारी प्रशासनात असल्यामुळे हा परिवर्तनप्रक्रियेला योग्य दिशा मिळू शकते.