‼️पंचामृत‼️*श्रीगणेशाची आणि इतर कोणत्याही पूजा करताना पंचामृत आवश्यक असतं। हे पंचामृत काय आहे, त्यातील घटकांचं प्रमाण किती असावं आणि त्याचे उपयोग काय आहेत हे या लेखात वाचू या। पंचामृताचे प्रमाण काय असावे…त्याचे फायदे काय ??
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
१. स्मरणशक्ती वाढते
२. शरिर निरोगी राहते
३. acidity साठी उत्तम उपाय
४. शक्तिवर्धक आहे
घटक
साखर १ चमचा मध
१ चमचा ताजे दही
२ चमचे साजुक तूप
२ चमचेकोमट दुध
५ चमचे (वरील प्रमाणात आणि वरील क्रमाने) हे रोज घेतल्यास, शरीर शक्ति, स्फ़ुर्ति, स्मरणशक्ती वाढते, कान्ति उजळते, ह्रदय मेन्दू ह्यान्चे पोषण होते. वात्-पित्त-कफ ह्या त्रिदोषान्चे सन्तुलन होते. ह्या पन्चाम्रुत मधे चिमुट भर केशर घातल्यास अजुन फ़ायदेशिर. केशर रक्तधातू वाढवणारे आणि रक्त शुध्दी करणारे आहे.
पंचामृत -पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर अथवा गूळ समप्रमाणात एकत्र घेणे. फक्त तूप किंवा मध समप्रमाणात घेऊ नये. दोहोंपैकी एकाचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यावे.
दूध – गाईचे दूध सर्वात श्रेष्ठ. ते पचायला हलके, गोड, पित्ताचा नाश करणारे, बळ देणारे आहे. शेळीचे दूध हे ही पथ्यकर असते. म्हशीचे दूध पचायला जड असते. – दूध तापवून प्यावे. – दूध कुठल्याही आंबट फळाबरोबर, -मासे, खार्या पदार्थांबरोबर घेउ नये. त्यामुळे शरीरात विषारे उत्पन्न होतात.
दही – दही खाताना थंड असले तरी पचल्यानंतर उष्ण गुणाचे होते. गोड, व्यवस्थित लागलेले दही पुष्टीकर असते. अर्धवट लागलेले किंवा आंबट दही रक्त दुषित करून त्वचाविकार निर्माण करते, सूज वाढवते. –
-दही गरम करू नये. -दही रात्री खाउ नये. -सर्दी, खोकला असताना दही खाऊ नये.
तूप – तूप भूक वाढवणारे, स्मृति, बुद्धी वाढवणारे, त्वचेचे कांतिवर्धन करणारे असते. डोळ्यांची आग होणे, दुखणे, चष्म्याचा नंबर यासाठी उपयुक्त. –
-अजीर्ण असताना तूप खाऊ नये. -पोट साफ होण्यासाठी -रात्री झोपताना गरम दूध तूप घ्यावे. -नाक लाल होऊन रक्त येत असेल तर नाकात तूप सोडावे. -डोळ्यांसाठी तूप, मध साखर रोज खाल्ल्याने फायदा होतो.
मध – मध गोड, रूक्ष, कफावर कार्य करणारा आहे. – मध गरम करून अथवा उष्ण पदार्थांसह खाऊ नये. – डोळ्यात मध घातल्यास डोळ्यांना फायदा होतो. – मध पाण्याने वारंवार लागणारी तहान शमते. – तोंड आले असता मध घालून पाण्याच्या गुळण्या कराव्या. साखर / गूळ – तहान कमी होते. – खडीसाखर सगळ्यात श्रेष्ठ आहे.
पंचामृताचे फायदे : – शरीर पुष्टी करते. – पोटात आग पडणे, जळजळ थांबवते – मानसिक शांति देते. – Stress कमी करून चिडचिड कमी होते – बुद्धीवर्धक – वजन वाढते. – सकाळी उठल्याबरोबर घेतले तर अर्धशिशीवर उतार मिळतो.