पितृ पक्ष १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या दिवशी पूर्वजांचे स्मरण करून श्राद्ध, विधी आणि पूजा केली जाते. पितृपक्षाच्या वेळी, आत्मा पृथ्वीवर परत येतो.आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी दान धर्म करतात.वेगवेगळ्या पद्धतीने श्राद्ध करण्याची प्रथा आहे.ज्यांना तिथी माहिती नाही ते सर्वपित्री अमावस्या ला श्राद्ध करतात. हा काळ लोक शुभ कार्य आणि खरेदी करत नाहीत कारण हा काळ शोकमय आहे असे मानले जाते. मात्र धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये कुठेही पितृपक्षाचा काळ अशुभ असल्याचा उल्लेख नाही .रामायण काळी सुद्धा रामाने विविध ठिकाणी श्राद्ध केल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो.
काशी,गया, त्रंबकेश्वर ,नासिक अशा पवित्र ठिकाणी श्राद्ध करण्याची पूर्वापार प्रथा आहे.
सौ मधुरा पंचाक्षरी
नासिक
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.