महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. ना. नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली आज आदिवासी पेसा भरतीसाठी आणि धनगर आरक्षणाच्या घुसखोरीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या अधिकारांसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, शंभुराजे देसाई, माजी मंत्री मधुकर पिचड, सर्व आदिवासी आमदार तसेच आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत आदिवासी समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, कॅबिनेटच्या पुढील बैठकीत या मुद्द्यांवर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजात एकता आणि निर्धाराचे वातावरण दिसून आले. नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एक ठोस दिशा दाखवली आहे.