ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला, आणि या विजयात नाशिकचा उदयोन्मुख खेळाडू साहिल पारखने महत्त्वपूर्ण योगदान दिले. साहिलने नाबाद १०९ धावा ठोकून संघाला विजयाच्या दिशेने नेले. त्याच्या या खेळीमुळे संपूर्ण सामना भारताच्या बाजूने फिरला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
साहिल पारखची फलंदाजी संपूर्ण सामन्याचं केंद्रबिंदू ठरली. मैदानावर उतरल्यानंतर त्याने जबरदस्त फटकेबाजी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. विशेष म्हणजे, त्याने आपल्या धडाकेबाज शैलीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत मैदानावर जमलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली.
साहिलच्या या खेळीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.साहिलच्या खेळीची सुरुवात थोडी सावध होती, परंतु काही वेळातच त्याने त्याची शैली बदलत, आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. विशेषतः, ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख गोलंदाजांवर दबाव आणून साहिलने त्यांचे हाल हाल केले. त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चौकार-षटकारांची बरसात केली. त्याचं संयम आणि कौशल्यपूर्ण खेळ त्याच्या भविष्यातील मोठ्या कामगिरीचं प्रतीक आहे.भारताने हे लक्ष्य सहज गाठताना साहिलने खेळाच्या अखेरच्या क्षणीही आपलं शतक पूर्ण केलं. त्याच्या नाबाद १०९ धावा म्हणजे फक्त वैयक्तिक कामगिरी नव्हती, तर भारतीय संघासाठी विजयाचं द्वार उघडणारं योगदान होतं. साहिलच्या या जबरदस्त प्रदर्शनामुळे नाशिकचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत आहे.या सामन्यानंतर साहिल पारखच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरु झाली असून, त्याच्या भविष्यकालीन क्रिकेट करिअरची सर्वत्र मोठी अपेक्षा व्यक्त होत आहे.