समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे विधान आणि वादंग
Abu Azmi statement : समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाचे समर्थन करत धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या मते, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान पासून ब्रह्मदेशपर्यंत पसरलेली होती. तसेच, त्या काळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता असा दावाही त्यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला असून अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संतप्त सवाल (Abu Azmi statement)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमी यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी प्रश्न केला की, “एकीकडे तुम्ही महाकुंभाला दोष देता आणि दुसरीकडे औरंगजेबाचे कौतुक करता, ज्याने देशातील मंदिरे उद्ध्वस्त केली. समाजवादी पक्षाने या विधानावर खुलासा करावा आणि त्यांचे आमदार का नियंत्रित करत नाहीत?” त्यांनी असेही सूचित केले की समाजवादी पक्षाने आझमी यांना पक्षातून बाहेर काढले पाहिजे.
अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया (Abu Azmi statement)
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “जर निलंबनाचा आधार विचारसरणी असेल, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गुलामगिरी यात काय फरक राहिला? सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.” त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या पक्षाचे आमदार आणि खासदार निर्भय शहाणपणा बाळगून आपले विचार मांडतात.
https://twitter.com/ani_digital/status/1897201494774177839
अबू आझमी यांचे निलंबन
आज विधानसभेत अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो मंजूरही करण्यात आला. अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणामुळे समाजवादी पक्षाला राजकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे.