भिल्ल समाजाला न्यायन मिळाल्यास व्यापक स्वरूपाचे आंदोलन करणार : अँड.शिवाजीराव काकडे

bhilla samajala nyan na milalyas vyapak swarupache andolan

शेवगाव तालुक्यातील मौजे भावीनिमगाव , खरडगाव येथील आदिवासी समाजाने दि.10 रोजी शेवगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी अजित कुमार बांगर यांच्याकडे विविध मागण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात असे म्हटले की भावी निमगाव येथे समाजाची 35 ते 40 कुटुंबाची लोक वस्ती गेल्या बऱ्याच वर्षापासून वास्तव्य करत आहे या लोकांना राहण्याच्या जागे सोबत स्मशानभूमीची अडचण आहे गेल्या अनेक वर्षापासून येथे वास्तव्य असूनही तेथील भिल्ल समाजाला एखाद्याचा मृत्यू झाल्यास विधी ,करण्यासाठी हक्काची जागा नाही स्मशान भूमी व त्यासाठी जागा मिळण्यात यावी येथील काही लोकांना घरकुल मंजूर झाले परंतु जागे अभावी स्वतःचे घरकुल बांधता येत नाही स्वतंत्रपणे ग्रामपंचायत जागा अथवा शासकीय जागेत घरकुल बांधण्यास परवानगी देण्यात यावी स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्ष उलटूनही या समाजाच्या प्रगतीसाठी आपण ज्या पद्धतीने उचित पावले उचलायची होती त्यानुसार निर्णय घेण्यामध्ये शासन यंत्रणा कमजोर ठरत आहे वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर व्यापक स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनशक्ती विकास आघाडीचे अँड . शिवाजीराव काकडे यांनी दिला आहे. यावेळी भावीनिमगाव, खरडगाव येथील आदिवासी समाजाने शेवगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी यांना विविध मागण्यासाठी निवेदन देताना समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply