Bhaur Water Supply Crisis | Nashik Jal Jeevan Mission Failure | ग्रामस्थांचा प्रशासनावर संताप
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
देवळा (नाशिक) | नाशिक पाणीटंचाई – भऊर गावातील असह्य जलसंकटावरून संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून कार्यालयाला कुलूप ठोकले. जल जीवन मिशन योजनेतील अपूर्ण व निकृष्ट कामामुळे गावात पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून “पाणी द्या, नाहीतर आंदोलन उग्र होईल” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
जल जीवन मिशन फसले! – गावात पाणी, पण नळात नाही
नाशिक पाणीटंचाई – प्रधानमंत्री ‘हर घर नल’ संकल्पनेअंतर्गत भऊरमध्ये सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजनेचे काम ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे अर्धवट राहिले आहे. गावातील विहिरीत मुबलक पाणीसाठा असूनही, गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. योजना अपूर्ण असल्याने ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरितही झालेली नाही.
महिलांचा एल्गार! हंडा मोर्चातून प्रशासनाविरोधात जोरदार निषेध
गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या महिलांनी बुधवार (दि.18) रोजी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांनी रिकामे हंडे दाखवत निषेध नोंदवला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनादरम्यान “आम्हाला नळाने पाणी हवं!” अशी घोषणाबाजी झाली.
आंदोलनात मोठा जनसमुदाय सहभागी
या आंदोलनात शेकडो महिलांसह ग्रामपंचायत सदस्य, युवक व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. प्रमुख उपस्थितींमध्ये निलाबाई पवार, योगिता पवार, शिलाबाई पवार, संगीता जोंधळे, हर्षदा पवार, सीमा गरुड, गंगाराम ठाकरे, मनीषा पवार यांचा समावेश होता.
प्रशासनाची प्रतिक्रिया : काम सुरू आहे!
ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ पवार यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, पाईपलाईन गळती दुरुस्ती आणि नळ जोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, ग्रामस्थांनी तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.