✈️ आता आठवड्यात केवळ 3 दिवस दिल्ली विमानसेवा; नाशिक–दिल्ली प्रवाशांची मोठी गैरसोय

Now Delhi flight service only 3 days a week; Nashik-Delhi passengers suffer major inconvenience

नाशिक :
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू झाल्यामुळे, नाशिक–दिल्ली दरम्यान सुरू असलेली दररोजची विमानसेवा आता आठवड्यात फक्त तीन दिवसच उपलब्ध राहणार आहे. यामुळे प्रवाशांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता असून, त्यांच्या गैरसोयीचे प्रमाण वाढले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

फक्त मंगळवार, गुरुवार व शनिवार सेवा

दिल्ली विमानतळावरील २८/१० या धावपट्टीवर १५ जूनपासून देखभाल सुरू आहे. परिणामी, नाशिकहून दिल्लीला जाणारी विमानसेवा आता मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी सुरू राहणार आहे. ही स्थिती १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कायम राहणार आहे.

फटका संपूर्ण देशभरातील विमानसेवांना

दिल्ली विमानतळावर दररोज सुमारे १,४०८ विमानांची हालचाल होते. धावपट्टीच्या कामामुळे यातील २०० हून अधिक विमानांचे वेळापत्रक कोलमडले असून, ११४ विमाने रद्द तर ८६ विमाने विलंबित झाली आहेत.
नाशिक–दिल्ली विमान चार दिवस रद्द करण्यात आले असून, वेळ मात्र मागीलप्रमाणेच – सकाळी ९.५५ ला ओझरहून उड्डाण व १२.१० वाजता दिल्ली पोहोच.

विमान प्रवाशांची संख्या घटली

७ जून रोजी ओझर विमानतळावर विक्रमी १,३३४ प्रवासी होते. पण १२ जूनच्या एअर इंडिया अपघातानंतर प्रवाशांमध्ये मोठी घट झाली. २० जून रोजी केवळ ७४९ प्रवासी ओझरवर नोंदले गेले.
विमान प्रवासाबद्दलची भीती आणि दिल्ली विमानसेवेत झालेली कपात ही यामागची मुख्य कारणं मानली जात आहेत.

उद्योग व पर्यटन क्षेत्राची मागणी

बेंगळुरू व दिल्लीसाठी सध्या २३२ आसनी विमाने चालू असली तरी, वाढत्या मागणीच्या तुलनेत त्या कमी पडत आहेत. त्यामुळे या मार्गांवर दिवसातून किमान दोन विमाने उपलब्ध करावीत, अशी मागणी उद्योग व पर्यटन क्षेत्रातून होत आहे. मात्र, सद्यस्थितीत उलट सेवा कमी केली गेली आहे.