११ एप्रिल रोजी आमदारांच्या घरांसमोर मशाल आंदोलन
Bachchu Kadu – शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, ११ एप्रिल रोजी राज्यभरातील आमदारांच्या निवासस्थानी मशाल पेटवून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे आंदोलन प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मशाल आंदोलनाची ठिकाणे आणि वेळ
महात्मा जोतिबा फुले जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. ११) रात्रीच्या सुमारास हे आंदोलन करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानासमोरही हे आंदोलन होणार आहे.
कर्जमाफीच्या आश्वासनावरून सरकारवर टीका (Bachchu Kadu)
अजित पवारांच्या वक्तव्याने संताप
बच्चू कडू यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषण केले होते. त्या वेळी शासनाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यात, “कर्जमाफी शक्य नाही, शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करावी” असे स्पष्ट सांगितले. या भूमिकेमुळे प्रहार संघटना संतप्त झाली आहे.
महायुतीच्या जाहीरनाम्याची आठवण (Bachchu Kadu)
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ” असे जाहीर केले होते. तसेच अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. पण अद्याप कोणतीही ठोस कृती न झाल्यामुळे, प्रहार संघटनेने आता राज्यभर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.