नाशिक: बांगलादेश सरकारने स्थानिक कांद्याला Onion चालना देण्यासाठी भारतातून येणाऱ्या कांद्यावर १० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. यामुळे भारतातील कांदा Onion उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, केंद्र सरकारने तातडीने निर्यात शुल्क पूर्णतः रद्द करावे, अशी मागणी होत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भारताची बांगलादेशसोबतची कांदा Onion निर्यात अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या वर्षी २० टक्के तर त्याआधीच्या वर्षी १७ टक्के कांदा बांगलादेशला निर्यात झाला होता. मात्र, बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय कांदा निर्यातीवर मोठा परिणाम होईल आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कांदा Onion उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे म्हणाले, “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याला मागणी आहे. मात्र, निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे. केंद्र सरकारने हे शुल्क शून्य करावे.”
आंदोलन करूनही सरकारचे दुर्लक्ष
लासलगाव येथे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. शेतकऱ्यांची मागणी आहे की, सरकारने तातडीने हा मुद्दा सोडवून त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत.
शेतकऱ्यांच्या या असंतोषामुळे कांदा बाजारातील परिस्थिती अधिकच बिघडण्याची शक्यता आहे. आता केंद्र सरकारच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.