नाशिक ..जिल्ह्यात कांद्याच्या भावात दोन दिवसांत मोठी घसरण झाली आहे. मागील आठवड्यात सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला जाणारा कांदा आता दोन हजार रुपयांवर आला आहे. खरीप हंगामातील रांगडा कांद्याची विक्री नुकतीच सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
जिल्ह्यातील सटाणा, लासलगाव, चांदवड, उमराणे आणि देवळा या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात जवळपास दोन हजार रुपयांनी घट झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
केंद्र सरकारपर्यंत पोहोचला प्रश्न
खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत कांद्याचा मुद्दा उपस्थित केला असून, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमवेत निर्यातदार संघटनेने चर्चा केली आहे. दरम्यान, आमदार राहुल आहेर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कांदा निर्यात ड्यूटी २० टक्क्यांनी कमी करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीत भर
चारच दिवसांपूर्वी स्थिर असलेला कांदा बाजार आता गडगडल्यामुळे शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसत आहे. आता सरकारकडून तत्काळ हस्तक्षेप अपेक्षित आहे.