राज्यभर गाजणाऱ्या कोकाटे शिक्षेबाबत जयंत पाटलांचे वक्तव्य
नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेबाबत विधान केले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने महायुतीतील नेत्यांना चांगलेच धक्का बसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पाटील यांना परखड शब्दांत सुनावले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवरून राजकीय गदारोळ
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिका घेण्यासाठी बनावट उत्पन्न कागदपत्रे दाखल केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे. हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे.
या संदर्भात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया देताना, “तीस वर्षांपूर्वीचे प्रकरण अचानक समोर कसे आले? यामागे राजकीय हेतू असू शकतो,” असा संशय व्यक्त केला. तसेच, “महायुती सरकारमधीलच कोणीतरी हे प्रकरण पुढे आणण्यासाठी पडद्यामागून सूत्रे हलवत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
छगन भुजबळ यांची जयंत पाटलांना परखड सुनावणी
जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की –
“एखाद्या प्रकरणावर राजकीय विधान करण्यापूर्वी ठोस माहिती असायला हवी. हवेत बाण मारणे योग्य नाही.”
त्याचबरोबर भुजबळ यांनी जयंत पाटलांना शरद पवार यांच्याकडून काही धडे घ्यावेत, असा सल्ला दिला.
“शरद पवार यांच्या सहवासात राहूनही जयंत पाटील यांनी काय बोलावे आणि केव्हा बोलावे याचे भान ठेवले नाही. त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते सादर करावेत. विनाकारण राजकीय आरोप करणे योग्य नाही,” असे भुजबळ म्हणाले.