महिलांवरील अत्याचारांचे खटले निकाली काढा जिल्हाधिकाऱ्यांना विविध संस्थांचे निवेदन

महिलांवरील अत्याचारांचे खटले निकाली काढा जिल्हाधिकाऱ्यांना विविध संस्थांचे निवेदन

लव जिहाद तसेच महिलांवरील अन्याय व अत्याचार संबंधातील खटले तातडीने निकालात काढण्यात यावेत व या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

यावेळी आशा पाटील, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, मेघा शिंपी, कविता कुलकर्णी, संजय देशमुख, सुनील परदेशी, लक्ष्मण सावजी, योगेश मालुंजकर, संदीप काकड, राजेशकुमार शहा,

आरती आहिरे, कांचन जाधव, सुनंदा विसपुते, योगिता चव्हाण, राजनंदिनी अहिरे, रोहिणी क्षीरसागर, संध्या काळे, अनुसया गवळी, सीमा ललवाणी, कांचन चव्हाण, नैना गायकवाड, छाया चौधरी, आशा भोई आदीसह विविध संस्थांच्या

प्रमुख महिला उपस्थित होत्या. ग्राहक रक्षक समिती, शिखर स्वामिनी महिला संस्था, कर्तव्यदक्ष फाउंडेशन, मनुमानसी महिला मंडळ, राधिका फाउंडेशन, घर अंगण बहुद्देशीय संस्था पद्माक्षी आदी संस्थांनी पुढाकार घेऊन निवेदन दिले.

  • महिला-मुलींवरील अत्याचाराविरोधात शहरातील अनेक संघटना एकत्र आल्या असून, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हेगारांवर तात्काळ कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच आता बेटी बचाव, बेटी पढावबरोबरच बेटीने लढायला शिकायला हवे. या माध्यमातून आपण समस्त मुलींना आवाहन करतो की, तुम्ही स्वरक्षणाचे धडे घ्यावेत. जेणेकरून स्वतःची सुरक्षा करू शकतील.

संगीता गायकवाड, माजी नगरसेविका, अध्यक्ष, शिखर स्वामिनी महिला संस्था

Leave a Reply