नाशिक रोड, प्रतिनिधी*सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातींच्या उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी, अनुसूचित जाती-जमाती अधिकारी-कर्मचारी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांच्या नेतृत्वात २० सप्टेंबरला धडक मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता शालिमार चौकातील भालेकर हायस्कूलपासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मोर्चाची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेत प्रा. गंगाधर अहिरे, प्रा. इंदिरा आठवले, अरुण भालेराव, रोहित गांगुर्डे, परेश पवार, कृष्णा लोखंडे, राजाभाऊ बोढारे, नाना वाघमारे, प्रकाश जाधव, विजय अंढागळे, विनोद भालेराव, ज्ञानेश्वर साबळे, तुलसीदास पंढरी, रमेश जगताप आणि परेश पवार यांसारखे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.या मोर्चाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:1. अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण आणि क्रिमीलेयरचा निर्णय रद्द करून संसदेत विधेयक मंजूर करावे.2. खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे.3. न्यायालयाच्या निर्णयाचा समावेश संविधानाच्या नवव्या अनुसूचीमध्ये करावा.4. महाराष्ट्र शासनाने पदोन्नतीतील बंद केलेले आरक्षण तातडीने सुरू करावे.5. शासकीय आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रात खासगीकरण आणि ठेकेदारी पद्धत बंद करावी.मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याची अपेक्षा आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.