“जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा” या अभंगांच्या गजरात त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर वारी सुरू
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक | त्र्यंबकेश्वर – संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा मंगळवारी (दि. १०) श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूर आषाढी वारीसाठी भव्य आणि भक्तिपूर्ण वातावरणात प्रस्थान ठेवले. ५० हजारांहून अधिक वारकरी, भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर, महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आणि अभंगांचे स्वर या साऱ्यांनी त्र्यंबकनगरी भक्तिभावाने न्हालेली होती.Nashik Trimbakeshwar | संत निवृत्तिनाथ पालखी प्रस्थान – ५० हजार वारकऱ्यांसह भक्तीमय वारीची सुरुवात
पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य (Palakhi Sohala Highlights):
- एकूण अंतर: 480 किलोमीटर
- एकूण कालावधी: 27 दिवस
- दिंड्या सहभागी: 55 दिंड्या
- सुविधा: शासनामार्फत रुग्णवाहिका, पाणी टँकर, वॉटरप्रूफ मंडप
संत निवृत्तिनाथ पालखी प्रस्थान: एक भक्तीमय दृश्य
त्र्यंबकेश्वरातील कुशावर्त तीर्थावर पादुकांचा अभिषेक करून पालखीचे रथ श्री त्र्यंबकराजासमोर पोहोचले. नंतर वारकऱ्यांनी अभंग व कीर्तन सेवा सादर केली. चांदीच्या रथाची सजावट कैलास माळी आणि रवींद्र माळी यांनी स्वखर्चाने केली होती — सलग २७ वर्षे हा सन्मान त्यांनी निभावला आहे.
उपस्थित प्रमुख व्यक्ती व मानकरी:
- माजी नगराध्यक्ष: सुनिल अडसरे, बाळासाहेब अडसरे, अजय अडसरे
- शेतकरी प्रतिनिधी: सचिन शिखरे, निवृत्ती भुजाडे, मातुलेश्वर भजनी मंडळ
- संस्थान पदाधिकारी: अॅड. सोमनाथ घोटेकर, श्रीपाद कुलकर्णी, नवनाथ गांगुर्डे
- अन्य मान्यवर: कांचन जगताप, अमर ठोंबरे, नीलेश गाढवे, माधव महाराज राठी, इ.
वारकऱ्यांचा उत्साह आणि भाविकांचा ओघ
या वर्षी पावसाचा अभाव असूनही वारकऱ्यांच्या उत्साहात तसूभरही कमी नव्हती. वारीच्या सुरुवातीस अश्वनृत्य, अभंग गायन, वाद्यांचा गजर आणि भक्तांची गर्दी यामुळे वातावरण पांडुरंगमय झाले होते.
पहिला मुक्काम: पेगलवाडी फाटा (त्र्यंबकपासून 2 किमी)
सायंकाळी पालखीचा पहिला मुक्काम महानिर्वाणी आखाडा, पेगलवाडी फाटा येथे झाला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या. बुधवारी पालखी सातपूरमध्ये दाखल होणार आहे.