“केंद्रीय मंत्रिमंडळाने “वन नेशन, वन इलेक्शन” या धोरणाला मान्यता दिली आहे, ज्यामध्ये देशभर एकाच वेळी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने या धोरणाला अनुकूल असा अहवाल सादर केला, ज्याला आता केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या धोरणास पुढील टप्प्यात संसदेची मंजुरी आवश्यक आहे.”वन नेशन, वन इलेक्शन” या संकल्पनेवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. संसदेने या धोरणास मंजुरी दिल्यास लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्यात येतील. सध्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या काळात होतात, ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया आणि आचारसंहितेमुळे विकासकामांवर अडथळे येतात. भाजपच्या मते, हे धोरण निवडणूक प्रक्रियेतील खर्च आणि विलंब कमी करून प्रशासकीय यंत्रणेचे कामकाज अधिक परिणामकारक करेल.हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर या निर्णयाचा तातडीने परिणाम होणार नसला तरी, पुढील निवडणुकांमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.