१२२ कोटींच्या घोटाळ्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकल्याने चिंता वाढली
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Sanjay Raut: मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मोठी कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक धर्मेश जयंतीलाल पौन आणि मुख्य आरोपी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना अटक केली आहे. ठेवीदारांचे पैसे अडकले असून अनेकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
संजय राऊतांची (Sanjay Raut) भाजपावर घणाघाती टीका
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर गंभीर आरोप करताना म्हटले,
“न्यू इंडिया बँक लुटली गेली आणि यात सर्व भाजपाचे लोक आहेत. या बँकेत जनतेचा पैसा आहे, पण येथे बिल्डर, जैन आणि भाजपाचे कदम आहेत. भाजपाच्या लोकांनी बँक लुटली, त्यामुळे ते यावर बोलत नाहीत!”
राऊतांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आणि विचारले की,
“किरीट सोमय्या आता ईडीकडे का जात नाहीत? भाजपाचे आमदार या घोटाळ्यात अडकले आहेत. भाजपाच्या गृहमंत्र्यांनी आणि फडणवीसांनी उत्तर द्यावे. भाजपाशी आणि आरएसएसशी संबंधित बिल्डरांना बँकेचे पैसे वाटले गेले.”
अमेरिकेच्या विमानावरूनही साधला निशाणा
राऊतांनी अमृतसरमध्ये अमेरिकन लष्करी विमानाच्या लँडिंगवरूनही सरकारवर टीका केली. ते म्हणाले,
“काल अमृतसरमध्ये अमेरिकेच्या लष्कराचं विमान उतरलं. शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या, त्यांना बेड्या ठोकल्या गेल्या. मोदी सरकार काहीच करत नाही का?”
तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करत विचारले की,
“मोदींनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवलं, पण भारतीय नागरिक अमेरिकेत बेड्या घालून नेले जात आहेत, यावर ते गप्प का?”
सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया
राऊत पुढे म्हणाले,
“हिंदूंच्या कुंभमेळ्याच्या नावाखाली अन्याय केला जातो. दिल्लीत आणि प्रयागराजमध्ये हिंदू तुडवले जात आहेत, पण सरकार कुठे आहे?”