सिन्नर एमआयडीसीतील रासायनिक पाण्यामुळे नापीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

सिन्नर एमआयडीसीतील रासायनिक पाण्यामुळे नापीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

सिन्नर मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केमिकल मिश्रित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतजमिनींच्या मोबदल्यासाठी परिवर्तन कामगार सेनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गेल्या २० वर्षांपासून येथे केमिकल कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे शंभर एकर जमीन नापीक झाली आहे, परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. आता, शेतकऱ्यांनी अकरा दिवसांपासून उपोषण सुरू केले असून, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि इतर अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत फक्त टॅंकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय झाला आहे, परंतु शेतीच्या नुकसानीसाठी भरपाईची कोणतीही घोषणा झालेली नाही. Glob Chemical कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने क्लोजर नोटीस दिली असून, विद्युत वितरण कंपनीने लाईट कट करण्याची कारवाई केली आहे. तरीही, उद्योजकांनी जनरेटर वापरून उद्योग चालू ठेवले आहेत. सोमवारी पर्यंत निर्णय झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा परिवर्तन कामगार सेनेचे विशाल भदर्गे आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply