मुंबई, १० ऑक्टोबर: ज्येष्ठ उद्योगपती आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात आज (गुरुवार १० ऑक्टोबर) एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी आजचा दिवस दुखवटा पाळला जाईल. या शासकीय दुखवट्यादरम्यान राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. तसेच, या दिवशी कोणतेही मनोरंजन अथवा करमणुकीचे कार्यक्रम होणार नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले आहेत. रतन टाटा हे भारतातील उद्योगजगतातील एक मान्यवर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे निधन हे देशाच्या उद्योगजगतातील एक मोठे नुकसान आहे.