Daylight Murder in Nashik : नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर: दिवसाढवळ्या खून, शहरात भयाचे वातावरण

Nashik latest crime updates

नाशिक गुन्हेगारीत बिहारच्या पुढे? – शहरात खळबळजनक हत्या

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

किरकोळ वादातून युवकाचा खून – पांडवलेणी परिसर हादरला

Daylight Murder in Nashik : नाशिक, १४ एप्रिल: नाशिक शहरात गुन्हेगारीने थैमान घातले असून पांडवलेणी परिसरात किरकोळ वादातून एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे (Daylight Murder in Nashik) .चाकू आणि तलवारीसारख्या धारदार हत्यारांचा वापर करून झालेल्या या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितांना अटक करण्यात आली आहे.


काय घडलं नेमकं? – हल्ल्याचा सविस्तर तपशील

इन को छोडो मत, मार डालो’ – चिथावणीचा परिणाम

१३ एप्रिलच्या रात्री १०:३० वाजता पांडवलेणी जवळील ज्ञानपीठ सोसायटीसमोर साहिल सिंग आणि त्याच्या मित्रांवर टोळक्याने अचानक हल्ला चढवला. शौकत फरीद शेख (१९) याने सुरा दाखवून “इन को छोडो मत, मार डालो” अशी उचकावणी दिल्यानंतर, विजय माळेकर याने रामदास बोराडे याच्यावर वार करून त्याचा खून केला.

राजेश बोराडे याच्यावरही रोहित पालवे आणि शौकत यांनी हल्ला केला, तर साहिल सिंग याच्यावर प्रिन्स पालवे याने काचेची बाटली फोडून जखमी केले. इतर आरोपींनी तलवारीने गाड्यांचे काच फोडून परिसरात दहशत निर्माण केली.


नाशिक गुन्हेगारीच्या विळख्यात – पोलिसांवर टीकेची झोड

गुन्हेगारी वाढली, पोलीस हरवले? (Daylight Murder in Nashik)

गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये खून, चोरी, घरफोडी आणि महिलांवरील हल्ल्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. महिलांचे घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले असून, चोरी आणि घरफोडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

दुचाकी चोरीचा उच्छादही वाढला असून दररोज लाखो रुपयांची वाहने गायब होतात. नागरिकांमध्ये संताप पसरला असून, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यावर कठोर कारवाईचा दबाव वाढतो आहे.


कर्णिक यांची परीक्षा – गुन्हेगारी मोडून काढण्याचे आव्हान

शहराच्या सुरक्षेसाठी ठोस पावले आवश्यक

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना कठोर आणि ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. नागरिकांचे एकच मागणे – “शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करा.”