साईबाबांच्या नगरीत घडलेली शोकांतिका
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Shirdi : शिर्डीमध्ये साईबाबांच्या अन्नछत्रामध्ये जेवणाऱ्या भिक्षेकऱ्यांना डांबून ठेवल्याने चार जणांचा मृत्यू झाला. आयुष्यभर “भिक्षा मागा, सत्य सांगा” शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या मंदिर परिसरात हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे.
रामनवमीच्या दिवशी मोहीम, भिक्षेकऱ्यांची अटळ वेदना(Shirdi)
काय घडलं होतं?
- रामनवमीच्या दिवशी, भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पोलिस आणि नगरपंचायतीने संयुक्त मोहीम आखली.
- जवळपास ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी पकडले, गाडीत डांबले आणि विसापूरच्या भिक्षेकरी गृहात नेले.
- काही भिक्षेकऱ्यांची तब्यत खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचार नाही, बेडला बांधले गेले रुग्ण (Shirdi)
बेवारस म्हणून दुर्लक्षित?
- रुग्णालयात दाखल केलेल्या भिक्षेकऱ्यांना बेडला बांधून ठेवण्यात आलं.
- पाणीही न दिल्याचा आरोप आहे. उपचाराऐवजी रुमला टाळं ठोकण्यात आलं.
- यामध्ये चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाला असून माणुसकीला हादरवणारी ही बाब समोर आली आहे.
प्रशासन काय म्हणतंय? (Shirdi)
- रुग्ण गंभीर अवस्थेत दाखल झाले, आणि त्यांना अल्कोहोलिक व विड्रॉल सिम्प्टम्स होते, असं डॉक्टरांचं स्पष्टीकरण.
- “ससून रुग्णालयाने नातेवाईक नसल्याने दाखल करून घेतलं नाही,” असा दावा.
- काही भिक्षुक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून हातपाय बांधले गेले.
राजकीय संताप आणि चौकशीचे आदेश
- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
- खासदार निलेश लंके यांनी शिर्डी देवस्थान, पोलीस प्रशासन व रुग्णालयावर गंभीर आरोप केले.
- “हा एक प्रकारे प्रशासनाचा बळी आहे,” असा आरोप उभाठा गटाचा.
मुख्य प्रश्न अनुत्तरितच…
मरण्याऐवजी जेवण मिळालं असतं तर?
- शिर्डीच्या अन्नछत्रात दररोज हजारो भाविक जेवतात, मग २०० भिक्षेकरी जेवले असते तर काय बिघडलं असतं?
- भिक्षा मागणं हा गुन्हा कधीपासून झाला?
- देवाच्या दरबारात पोट भरायला गेलेल्या माणसाला मरण का आलं?