Udhav Thakre : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा: सरकारवर जोरदार हल्लाबोल

Uddhav Thackeray's Dussehra Rally

Uddhav Thackeray’s Dussehra rally at Chhatrapati Shivaji Maharaj Park: A strong attack on the government

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Latest News: दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, “लढाई सोपी नाही, आमच्या विरोधात अब्दालीसारखी शक्ती उभी आहे.” जनतेच्या पाठिंब्याशिवाय आपण उभे राहू शकलो नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले आणि जनतेचे ऋण कधीच फेडता येणार नाही, असे भावनिक वक्तव्य केले.

ठाकरेंनी भाजप आणि शिंदे सरकारवर टीका करत सांगितले की, “भ्रष्टाचारी सरकारला आम्ही चूड लावल्याशिवाय शांत बसणार नाही.” त्यांनी भाजपला आठवण करून दिली की, “महाराष्ट्रात भाजपला कोणी विचारत नव्हते, पण आम्ही त्यांना खांद्यावर घेतले होते. आता तेच भ्रष्ट नेत्यांसोबत मिळून आमच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

हिंदू आणि मराठी जनतेच्या प्रश्नांवर आवाज

ठाकरे यांनी हिंदू आणि मराठी जनतेवर होणाऱ्या अन्यायाचा उल्लेख करताना सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, “हिंदू धोक्यात कसे आहेत, हे तुमच्या सरकारला सांगावे लागते का?” मुलींवरील अत्याचारांबद्दल आवाज उठवताना त्यांनी विचारले, “तो हंबरडा तुमच्या कानावर का पडत नाही?”

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महाराष्ट्राच्या भविष्याबद्दल चिंता

शेतकऱ्यांच्या समस्यांचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांचे अश्रू मला दिसतात, पण सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रयत्नशील राहू.” तसेच, सध्याच्या सरकारने चुकीचे निर्णय घेतले आहे ते रद्द करण्याचे वचन त्यांनी दिले.

धारावी आणि छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर भाष्य

धारावीतील प्रकल्पांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “धारावीत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरांची सोय करणार आणि सत्तांतरानंतर धारावीचा निर्णय बदलणार.” त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी प्रत्येक जिल्ह्यात मंदिर उभारण्याचे आश्वासनही दिले.

RSS आणि विरोधकांवर टीका

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत सांगितले की, “RSS ला हिंदूंची मते मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक यंत्र वाटतात.” ते पुढे म्हणाले, “मी बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही, विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहणार.”

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मोठी घोषणा करत सांगितले की, “आपलं सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचे मंदिर बांधणार.”छत्रपती शिवराय हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हे मंदिर उभारले जाणार आहे. यामुळे तरुण पिढीला छत्रपती शिवरायांचे विचार आणि आदर्शांची ओळख होईल, असे त्यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात न्यायव्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करत सांगितले की, “तीन सरन्यायाधीशांची कारकिर्द संपत आली तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही.” त्यांच्या या वक्तव्याने न्यायप्रक्रियेतील विलंबावर रोष व्यक्त करत महाराष्ट्रातील राजकीय संघर्षात अद्याप न्यायाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितलं.

Leave a Reply