नाशिक | ९ जुलै २०२६
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील नदी-नाले भरून वाहत आहेत. गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
रामकुंड परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, गोदावरी नदीतील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस कायम राहिल्यास विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाऊ शकतो.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
गोदावरी नदीच्या पात्रात जाऊ नका.
नदीकाठी जनावरे नेणे टाळा.
शेतीचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवा.
जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
पावसाळी पर्यटन टाळा आणि सुरक्षित राहा.
– सुरक्षित राहा, सतर्क राहा.